Tuesday, November 23, 2010

कांदा हवामान

हवामान
कंद वर्गातील भाज्यामध्ये व्यापारीदृष्ट्या कांदा हे सर्वात महत्त्वाचे पिक आहे. देशाच्या २५ टक्के उत्पादन एकटया महाराष्ट्रात होते . महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा प्रथम स्थानावर आहे. मुख्यत: हिवाळी हंगामातील पिक १० ते १२ तासांच्या सूर्य प्रकाशात चांगली वाढ होते . कांदा पिक उष्ण कटिबंधात वाढणारे असून समशितोष्ण हवामान चांगले मानवते. जास्त थंड व दमट हवामानात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो . कांद्याच्या पानांची चांगल्या वाढीसाठी सरासरी १० ते १५ अंश सेल्सिअस तर कांदा चांगला पोसण्यासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान तर काढणीसाठी ३० अंश सेल्सिअस आवश्यक आहे

No comments:

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...